मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली:- भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त नुकतेच आलापल्ली येते गडचिरोली जिल्हाचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम आले होते. हा कार्यक्रम झाल्यावर अहेरी येथे परत येतांना आलापल्ली बस स्थानक जवळ अनेक विद्यार्थी बस येण्याची वाट बघत असल्याचे राजे अम्ब्रिशराव आत्राम लक्षात आले.
त्यामुळे स्वतः गाडी थांबवून विद्यार्थ्यांची आस्थेने विचारपूस केली, 3 तासापासून थंडीत हे विद्यार्थी बससाठी वाट बघत असल्याचे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी विद्यार्थ्यांनी सांगितले आणि संवेदनशील मनाचे जन प्रतिनिधी असलेले राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी अहेरी आगाराचे आगार व्यवस्थापक (DM) युवराज राठोड यांना स्वतः फोन लावुन चांगलीच तंबी दिली. आणि या सर्व विद्यार्थ्यांसाठी बस तात्काळ आलापल्ली साठी सोडण्याची सूचना त्यांना केली.
राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या प्रयत्नाचे फलित म्हणून काही वेळातच बस आली व अम्ब्रिशराव आत्राम यांनी लगेच सर्व विद्यार्थ्यांना साठी केळी आणि पाण्याची व्यवस्था करून दिली, सर्व विद्यार्थी बस मध्ये चढत पर्यंत स्वतः तिथे थांबले. बस रवाना होताच राजे अम्ब्रिशराव आत्राम अहेरीसाठी निघाले. अशा संवेदनशील राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचं सर्विकडे कौतुक करण्यात येत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

