✒️प्रविण जगताप, विशेष प्रतिनिधी
मो. 9284981757
हिंगणघाट:- दिनांक 26 नोंव्हेबर 2022 ला भारतीय संविधान दिनाच्या वर्धापन दिनानिमित्ताने हिंगणघाट येथील आंबेडकरी युवा संघर्ष समितीच्या वतीने सविधान निमित्त अभिमान संविधानाचा कार्यक्रमात आयोजित करण्यात आला. सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पुतळ्याला माल्यापर्ण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सकाळी दहा वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून अभिमान संविधान रॅलीला सुरुवात करण्यात आली, रॅलीमध्ये डॉ. बी.आर आंबेडकर विद्यालय, ज्ञान संवर्धन अध्यापक विद्यालय, भारतीय बौद्ध महासभा, अंधश्रद्धा समिती, सावित्रीच्या लेकी व रमाई मंच, विराट सिक्युरिटी एजन्सी, आणि शहरातील विविध राजकीय पक्ष संस्था संघटनेने सहभाग घेतला. हि रॅली शहरातील प्रमुख मार्गाने तहसील चौक, तुकडोजी महाराज चौक, कारंजा चौक मार्ग, सुभाष चौक, इंदिरा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समारोप करण्यात आला. त्यानंतर अकरा वाजता भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन ज्ञान संवर्धन अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या अस्मिताताई दारुंडे ( भगत ) ,व सौ. सीमाताई मेश्राम यांनी प्रस्तावना वाचन केले. दुपारी बारा वाजता रांगोळी स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये विविध मुलां मुलीनी रांगोळी स्पर्धेत सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रमोदिनी नगराळे यांनी केले.त्यानंतर दुपारी एक वाजता भारतीय संविधान आणि महापुरुषांच्या जीवन चरित्रावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली, स्पर्धेचे नियोजन व सूत्रसंचालन प्राचार्या अस्मिताताई दारुंडे ( भगत)यांनी अभ्यासपूर्ण प्रश्न विचारुन स्पर्धकांनीही उत्स्फूर्तपणे प्रश्नांना उत्तरे दिली. स्पर्धा यशस्वी करण्याकरता तेजस्विनी पाटील, अश्विनी पाटील यांनी सहकार्य केले. दुपारी तीन वाजता डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली.या स्पर्धेत उत्साही कलावंताने सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वी केली. डान्स स्पर्धा सूत्रसंचालन अनुला सोनकुवर यांनी केले, सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अनिल जवादे आमदार समीर भाऊ कुणावर, अशोक रामटेके, इत्यादी मान्यवर उपस्थित होते, या कार्यक्रमात सत्कार समारंभ घेण्यात आला व तसेच मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल मून यांनी केले तर आभार प्रदर्शन रसपाल शेंदरे यांनी केले. रात्री सात वाजता कव्वालीचा महासंग्राम कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कव्वाल यांनी आपल्या गायनातून मंत्रमुग्ध केले. एकूणच दिवसभर चाललेल्या कार्यक्रमाला शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रमाला यशस्वी केले.