संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
पाचगाव:- दिवसें न दिवस वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण, जंगल तोड, जल प्रदूषण, कमी पाऊस, आटते जलस्त्रोत, उपलब्ध जलसाठ्यांचा गैरवापर यांच्यामुळे पाणी ची टंचाई जाणवत आहे. व हा एक गंभीर मुद्दा बनला आहे. आणि पाणी टंचाई चा प्रश्न मनुष्यच सोडवू शकतो. जर प्रत्येक व्यक्ती पाण्याचे महत्व समजून त्याचा सांभाळून उपयोग करेल तर मग कधीही पाण्याची कमतरता भासणार नाही. म्हणतात न थेंबे थेंबे तळे साचे असाच एक उपक्रम पाणी अडवा पाणी जिरवा अंतर्गत कृषी विभाग राजुरा वअंबूजा सिमेंट फाऊंडेशन, उपरवाही उत्तम कापूस व ग्रामपंचायत पाचगाव यांच्या सयुक्त विद्यमानाने लोकसहभागातून मौजा पाचगाव येथे नाल्यावर वानराई बांधण्यात आला.
यावेळी कृषी पर्येंवेक्षक गादंगीवार, कृषी सहायक रंगनाथ खटिंग, प्रक्षेत्र अधिकारी गोपाल जंबुलवार, रुपेश गेडेकर, ग्रामपंचायत सचिव श्री. राठोड, सरपंच नामदेवजी आळे, ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी, शिपाई यादव पिदूरकर, रामा आळे, लक्ष्मण गेडाम तसेच इतर शेतकरी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348