सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर:- जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी सफाई कामगारानी प्रशासना विरुध्द एल्गार पुकारला आहे. 28 तारखे पासून त्यांनी लक्षणीय साखळी उपोषण सुरू केले असून स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
चंद्रपूर जील्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी सफाई कामगार हे 15 ते 20 वर्षापासुन काम करत आहेत त्यांनी करोना महामरीच्या काळात प्राण हातावर घेऊन आपली जबाबदारी प्रामाणिक राहून पार पाडली. पण आता प्रशासनाकडून कुठलीही सूचना न देता कामावरून कपात करण्यात आले असल्याने हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी सफाई कामगार आक्रमक झाले आहे. त्यामुळे सोमवार पासुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांच्या नेतृत्वाखालील कंत्राटी सफाई कामगारच्या विविध मागण्या घेऊन जिल्हा परिषद चंद्रपूर परिसरात साखळी उपोषणाला सुरवात केली आहे.
सोमवार पासून सुरू असलेल्या सफाई कामगारांच्या आंदोलनाकडे प्रशासन व अधिकारी डोळेझाक करीत आहेत. कामगारांचे आंदोलन न्यायपूर्ण असल्याने मागण्या मान्य करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांनी केली. कामगारांच्या सर्व मागण्या कायद्याला अनुसरून असल्याने या आंदोलनाला सक्रीय पाठींबा देत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन पूकारले आहे. त्यांच्या आंदोलनाचा बुधवारी तिसरा दिवस असला तरी मागण्यांची दखल अजुन पर्यंत प्रशासना तर्फे घेण्यात आली नाही.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348