शिक्षण व क्रीड़ातुन युवक व युवतीनी उत्तुंग भरारी घ्यावे! एथलेंटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या नम्रता ओतारी यांचे प्रतिपादन.
मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:– युवक व युवतींनी दर्जेदार शिक्षण व कला गुणातुन उत्तुंग भरारी घ्यावे असे प्रतिपादन राष्ट्रीय पातळीवरील एथलेंटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविलेले तथा अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांचे अर्धांगिनी नम्रता ओतारी यांनी केले.
त्या स्थानिक बौद्ध विहाराच्या प्रांगणात ज्ञान प्रसारक नवयुवक मंडळाच्या वतीने आयोजित 6 डिसेंबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी उदघाटनीय स्थानावरुन बोलत होते.
यावेळी विचार पीठावर उदघाटन स्थानी नम्रता ओतारी, अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दामोदर राऊत, प्रमुख अतिथि म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवाजी अलोणे, मंडळाचे अध्यक्ष एकनाथ चांदेकर, शोभाताई भिमटे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे अध्यक्षीय स्थानावरुन बोलताना नम्रता ओतारी म्हणाल्या की, जिल्ह्यातील व खास करून अहेरी उपविभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी , युवक-युवतींमध्ये सुप्त, कला व क्रीड़ा गुण उपजत असून क्रीड़ा व कला गुणाना वाव मिळणे अत्यावश्यक असल्याचे आणि युवक व युवतींनी जिद्द , परिश्रम, चिकाटी अंगी बाळगुन वाटचाल केल्यास यशाची शिखरे आपोआप गाठता येते. असे म्हणत पुढे त्यांनी, या भागातील युवक-युवतींना योग्य व चांगली दिशा मिळावी यासाठी माझे स्वतःचेही कसोशिने प्रयत्न असून आपण स्वतःही निःस्वार्थ व सामाजिक सेवेच्या भावनेतून प्रशिक्षण व शिकवनी देत असल्याचे नम्रता ओतारी यांनी आवर्जून सांगितले. आणि उत्तम व दर्जेदार शिक्षण व क्रीड़ा गुण प्रत्येकानी अंगिकारावे असे आवाहन करून यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले.
अन्य मान्यवरांनी सुद्धा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकले. तत्पुर्वी नम्रता ओतारी यांच्या शुभहस्ते नीळा ध्वज फड़कावून सामूहिक रित्या त्रिशरण-पंचशील ग्रहण करण्यात आले. त्या नंतर मान्यवरांच्या शुभहस्ते महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दिप प्रज्वलित करून व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव सुरेंद्र अलोणे यांनी केले. सूत्रसंचालन राहुल गर्गम यांनी तर उपस्थितांचे आभार मारोती ओण्डरे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.