नासिर सुलेमान खान नवीमुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
पालघर:- मुंबई – अहमदाबाद महामार्गावरून एक संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई महानगर हादळल आहे. मुंबई – अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत एका 21 वर्षीय विवाहित महिलेचा चालत्या प्रवासी इको कारमध्ये विनयभंग केला त्यानंतर आरोपींनी पीडित महिलेच्या 10 महिन्याच्या मुलीला कारमधून बाहेर फेकून दिले त्यात त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी 10 डिसेंबर सकाळी साडेअकारा वाजेच्या सुमारास विरार फाटा येथे घडली.
महिला वाडा तालुक्यातील पिंपलास गावामधील राहणारी होती. तर पती नालासोपारा मध्ये पेल्हार मध्ये एका कंपनीत काम करत होता. त्याला भेटण्यासाठीच ती जात असताना हा प्रकार घडला आहे. या संतापजनक घटनेत पिढीत महिला ही गंभीररित्या जखमी झाली असून वसई विरार महापालिकेच्या तुलिंज रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेप्रकरणी कलम 302, 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून इको कार चालक विजय कुशवाह याला कारसह मांडवी पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. पोलीस तपासातून संपूर्ण घटना काय आहे हे समोर येणार.
काय आहे घटना…
पीडित महिला ही आपल्या 10 महिन्याच्या मुलीला घेऊन, नालासोपारा पेल्हार फाटा येथून GJ 15, PJ 1137 या नंबरच्या इको कारमध्ये बसून आपल्या गावी जाण्यासाठी निघाली होती. काही अंतरावर पुढे गेल्यानंतर कारमधील इतर नराधमांनी तिच्याशी असभ्य वर्तन करीत तिची छेड काढत विनयभंग केला. त्यानंतर आरोपींनी पीडितेच्या 10 महिन्यांच्या चिमुकलीला बाहेर फेकले. त्याला वाचवण्यासाठी महिलेनेही गाडीतून बाहेर उडी मारली. त्यात ती जखमी झाली तर तिच्या बाळाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा आरोप पीडित महिलेने केलाय.
दरम्यान, महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी त्याच इको कारमध्ये पीडित महिला आणि मुलीला घेऊन तुलिंज येथील रुग्णालयात दाखल केले. पण मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348