विनोद ठमके, विरुर स्टे.प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विरूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील वीरुर ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले आहे. या निकालांमध्ये भारतीय काँग्रेस पक्ष समर्थित उमेदवारांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोठ्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक ग्रामपंचायत विरूर येथे झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने बहुमतांनी विजय संपादन केले. यात काग्रेसचे सरपंच अनिल आलाम ग्रा.प. सदस्य म्हणून निवडून आलेले उमेदवार 7, व शेतकरी संघटनेचे 2, गोंडवाना पार्टीचे 1, भाजपाचे 1 अशा प्रकारे काँग्रेसने बहुमत घेऊन विजय मिळविला आहे. गावात जलोसाने त्यांचे स्वागत करण्यात आले या विजयाच्या मागे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मेहनतीचे घेतली. सुरेश पावडे, अजय रेड्डी, विलास आक्केवार, अजित सिंग, धनेश्र्वर तुरणाकर, प्रवीण चिडे, राजू इग्रपवार, प्रशांत पवार, संगेश पावडे, धनेश्वर मोरे, नामदेव चीडे आदींनी परिश्रम घेतले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

