‘वंचित’ला महाविकास आघाडीत विरोध होतोय का? संजय राऊतांनी दिले स्पष्ट उत्तर
✒️राज शिर्के, मुंबई पवई प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई, 04 जानेवारी:- सध्या राज्यात भीमशक्ती आणि शिवशक्ती बनवण्यासाठी हालचालीचा जोर आला आहे. त्यात ‘प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेमध्ये चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीला याची पूर्ण कल्पना आहे. आमच्या चर्चेची माहिती अधिकृतपणे दिली आहे. कुणाचा विरोध आहे, किंवा नाही हे भविष्यात कळेल. पण, आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दलित जनता आली आहे. वंचित आघाडी एकत्र आली तर राज्यात नक्की परिवर्तन घडेल’ असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. शिंदे गट आज जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत युती जाहीर करणार आहे. तर शिवसेनेनंही वंचित आघाडीला एकत्र घेण्याची तयारी सुरू केली आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
‘प्रकाश आंबेडकर हे सकारात्मक आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती ही ताकद आहे. सध्या राज्यात ज्या प्रकारचे राज्य सरकार आहे, ते उलथवून लावण्यासाठी एकत्र येणे गरजेच आहे, असं परखड मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.
प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेमध्ये चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीला याची पूर्ण कल्पना आहे. आमच्या चर्चेची माहिती अधिकृतपणे दिली आहे. कुणाचा विरोध आहे, किंवा नाही हे भविष्यात कळेल. पण, आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दलित जनता आली आहे. वंचित आघाडी एकत्र आली तर राज्यात नक्की परिवर्तन घडेल’ असंही राऊत म्हणाले.
‘एकनाथ शिंदे आणि जोगेंद्र कवाडे एकत्र येत आहे, त्याबद्दल मला माहिती नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या दलित नेते आणि जनता ठामपणे पाठीशी उभे आहे. शिवसेना त्यांच्याशी चर्चा करत आहे, असंही राऊत म्हणाले.
‘आम्ही पुन्हा एकदा जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहोत. आम्ही तुमच्यासारखे पळकुटे, लफंगे नाही, तुम्ही म्हणजे न्यायालय नाही. तुम्ही म्हणजे काय कोर्ट नाही. केसरकर हे जर असे बोलले असेल तर 2024 मध्ये जेलमध्ये जाण्याची त्यांनीही तयारी ठेवावी, असा पलटवार राऊत यांनी केसरकरांवर केला.
‘आज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अजित पवार यांनी विधान केलं, त्याबद्दल भाजपचे लोक निदर्शनं करत आहे. पण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांचा दारात जाऊन आंदोलन का केलं नाही. राज्यपाल हटवाची घोषणा का करत नाही. त्यांनी माफी मागावी अशी मागणी का करत आहे. सुदांशू त्रिवेदी यांनी विधान केलं त्याचा कडाडून विरोध का करत नाही. संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत भावनाशील आहोत. शिवाजी महाराजांच्या अपमानाबद्दल भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे का बोलत नाही, असा सवाल राऊत यांनी भाजपला केला.

