पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- तथागत बुद्धविहार हिवरी नगरात 26 फेब्रुवारी रोजी भारतीय बौद्ध महासभा तथागत धम्म प्रचार दीक्षाभूमी बचाव संघर्ष समिती कडून भव्य धरणा आंदोलन करण्यात आले. याकरिता अनेक वक्तांनी महाबोधी विहाराच्या इतिहासावर प्रकाश टाकला यासोबत आज वर्तमान परिस्थितीत व भविष्यातील रणनीती यावरही चिंतन व मनन करण्यात आले.
यात प्रामुख्याने प्रत्येक बुद्ध विहारात जाऊन जनजागृती करणे आणि आणि लोकांना आंदोलन करण्यासाठी तयार करणे व हा लढा कसा यशस्वी होईल यावर कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली. भविष्यात बौद्ध गया विहार मुक्ती करणे म्हणजे आपला आपल्या सम्राट अशोकाच्या बौद्ध धम्माच्या वारसा पुढील पिढ्याकरिता सुरक्षित करणे हे याचे मुख्य उद्देश आहे. त्याचप्रमाणे मनुवादी व्यवस्थेने 1949 चा कायदा रद्द करत नाही. हा एक प्रकारे बौद्ध जनतेवर घोर अन्याय असून हे जातीवादाचे लक्षण आहे. जगातील हे आठवे आश्चर्य आहे कारण वर्तमान काळात ज्या धर्माचे स्थळ असेल त्यांच्याच अधिपत्याखाली त्या धर्मस्थळाचं संरक्षण केल्या जाते व्यवस्थापन केल्या जाते परंतु बौद्ध गया विहार हे अन्य धर्मीयांच्या अधिपत्याखाली असून त्यात बौद्ध लोकांचा काही सहभाग नसल्यासारखा आहे.
याविषयी भारतात अनेक राज्यांमध्ये बौद्ध अनुयायांची संख्या वाढत आहे व हे आस्थेच्या ठिकाणावर मनुवादी व्यवस्थेकडून होत असलेली व्यवस्था आम्ही कोणत्याही प्रकारे सहन करू शकत नाही. म्हणून आता हे मागील 14 दिवसा पासून आंदोलन सुरू आहे. अनेक लोकांची प्रकृती चिंताजनक झालेली आहे तरीपण राज्य सरकार असो या भारत सरकार यांच्याकडून साधी विचारपूस ही झालेली नाही. हा सुद्धा जाणून-बुजून केलेला अन्याय होय. म्हणून भविष्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही व यासाठी लागणारी सगळी शक्ती युक्ती याची आम्ही तयारी करत असून कोणत्या रस्त्यावरची लढाई असो न्यायालयीन लढाई असो या आंतरराष्ट्रीय स्तरावरची लढाई असो किंवा आंतरराष्ट्रीय लढाई असो लढण्यास आता सज्ज आहोत. जेव्हा पर्यंत आता मुक्ती होणार नाही तेव्हापर्यंत हा लढा आम्ही लढणार आहोत असे ठरवण्यात आले.
यात प्रामुख्याने राकेश धारगावे, राहुल मोरे, पियुष वाघमारे, सुधाकर शेंडे, सुरेश पाटील, नरेश पानतावणे, दिलीप रामटेके, गुलाब पाटील, रमेश लोखंडे, देवानंद मेश्राम, रामकृष्ण वासनिक, जगदीश खोब्रागडे, सुरेश पाटील, लक्ष्मीकांत मेश्राम, अरविंद रंगारी, भारत खोब्रागडे, जयप्रकाश बोधी, विशाल मानवतकर, कविता गणवीर, देवकाबाई तिरपुडे, अनुर्ता खोब्रागडे, दुर्गा नाईक, उषा गायकी, शिशुपाल रामटेके, उत्तमराव चव्हाण, डी एम सहारे, राजकुमारी रामटेके, दौलतराव रामटेके, प्रल्हाद वावरे, राजेश मेश्राम, जी. भोवते, वासुदेव वानखेडे, ॲड. साखरे, दिलीप रामटेके, सत्यवान मेश्राम, दिलीप जी फुललेले, ज्योती वनकर, किरण गौरखेडे, पपीता खोब्रागडे, पद्माकर गणवीर, विजय मेश्राम, सुजल भुजाडे, डॉ. उरकुडे, लांजेवार, प्रवीण कांबळे, डॉ.टी.वी वासनिक, गंगाधर कांबळे, सुधा मेश्राम, के.घरडे, शिल्पा नागदेवते, विजय गजभिये, पुन्हादास गजभिये, सुनील जवादे, हर्षल शेंडे, किशोर डहाके, सिद्धार्थ नारनवरे, निर्मला शेंडे, बबीता धारगावे तसेच यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते.

