✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो .9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- मागील तीन-चार महिन्यापासून सतत त्याने अंतोरा गावामध्ये पंचशील ध्वजाचे साठी आंदोलन चालू असताना काही जातीवादी लोकांनी प्रकरण चिडगव्हाचे प्रयत्न केले समाजामध्ये तेढ निर्माण होईल कायदा सुव्यवस्था बिघडणार असे त्या गावातील समाजकंटकांचे उद्दिष्ट असावे पण जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेने व संविधानिक रित्या काम करणाऱ्या भीम आर्मी द्वारा प्रकरणाचे संपूर्ण बाजू समजून घेऊन त्यावर दखल घेत अखेर बौद्ध बांधवांना न्याय मिळाला आणि संबंधित प्रकरणावर पूर्णविराम लागले.
प्राप्त माहितीनुसार वर्धा जिल्हातील आष्टी तालुक्यातील अंतोरा माणिकनगर गावामध्ये दि.27 जानेवारी रोजी काही दोन समाजात विष तेड निर्माण करणाऱ्या लोकांनी पंचशील ध्वजाचे अपमान केले याकरिता माणिक नगर येथे आष्टी तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरातील बौद्ध बांधव हे तिथे जमा झाले आणि पोलीस प्रशासनाला तक्रार सुद्धा केली व गावकऱ्यांनी फोन कॉल द्वारे भीम आर्मी भरती एकता मिशन चे विदर्भ प्रमुख अंकुश भाऊ कोचे सदर घटनेची माहिती दिली व व्हिडिओ सुद्धा पाठवले अमरावती जिल्हा अध्यक्ष रितेश भाऊ तेलमोरे त्यांच्या टीमसह गावामध्ये दाखल झाले बौद्ध बांधवाची आणि तेथील गावकऱ्यांची घटनास्थळ ची माहिती घेतली जी घटना झाली ती अतिशय निंदनीय घटना व पंचशील ध्वजाच्या झेंडा कापण्या प्रकरणावरून समस्त बुद्ध बांधवांचे भावना दुखावला गेला याकरिता अंकुश कोचे आणि तेथील गावकरी वर्धा येथे जमा झाले संबंधित घटनेचे पाठपुरावे सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले तक्रारदार ज्या लोकांना तेथे झंडा नकोसा ते सुद्धा लोक तिथे उपस्थित होते आणि समस्त बहुजन समाजातील शिष्ट मंडळ बीएसपी भीम टायगर सेना हे देखील संघटना गावकऱ्यांच्या सोबत होत्या जिल्हाधिकार्यालयाने यावर तात्काळ मीटिंग घेऊन संबंधित गोष्टीवर दखल घेऊन गावकऱ्यांच्या इच्छेने तेथील बौद्ध बांधवांच्या समजूत काढून त्यावर मार्ग काढत बुद्ध बांधवांना पंचशील ध्वजेसाठी एक भूखंड देण्यात आला त्यामध्ये ते जागा योग्य स्वरूप आणि बांधकाम करून ग्रंथालय बांधून स्वयं जिल्हा प्रशासकीय अधिकारी संबंधित काम पूर्ण झाल्यावर मानसमानाने पंचशील ध्वजाचे त्या ठिकाणी ध्वजारोहण करणार संबंधित प्रकरण मधील जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते सर्वांच्या संमतीने हा ठराव मंजूर करण्यात आला आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाला निवेदन सुद्धा देण्यात आले.
या प्रकरणी गुन्हेगारावर योग्य ती चौकशी करून कारवाई करावी आणि ज्या परिस्थितीमध्ये आता तिथे पंचशील ध्वज आहे दिलेल्या कामाचे काम पूर्ण होत पर्यंत पंचशील ध्वज तिथेच राहणार आणि जिल्हा प्रशासन सुद्धा संबंधित बाबीवर बारीक नजर ठेवून कडे कोड बंदोबस्त करत आहे प्रकरणाचा तपास करून गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई करावी ही सर्वश्री भीम आर्मी ची मागणी आहे.

