नितेश पत्रकार, झरि तालुका प्रतिनिधी
मो.नं 7620029220
यवतमाळ :- जिल्हातील पाटणबोरी येथे नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात यावी याकरिता राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे विदर्भ प्रदेश सहसंघटक सचिन रमेशराव पत्रकार यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज 9 ऑगस्ट ला मुंबई येथे निवेदन दिले
पाटणबोरी हे गाव यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून लोकसंख्या दहा हजाराच्या वर आहे. पाटणबोरी पोलीस दूरक्षेत्र अंतर्गत 49 गावे येत असून हे गाव महाराष्ट्र व तेलंगाना सीमेवर वसलेले आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर बसलेले असल्याने सतत अपघात ट्रक लुटमारीच्या घटना, चोरी, तस्करी यासारखे घटना नेहमीच घडत असतात .या गावाजवळ टिपेश्वर अभयारण्य सुद्धा वसलेले आहे. सदर गाव पांढरकवडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असून कोणत्याही कामाकरिता नागरिकांना पांढरकवडा येथे पैसे व वेळ खर्च करून जावे लागते. अर्ली हे गाव पांढरकवडा पोलीस स्टेशन वरून सुमारे पन्नास किलोमीटरवर आहे । पाटणबोरी येथून हे गाव 30 किलोमीटर अंतरावर आहे। अर्ली गावातील नागरिकांना कोणत्याही कामाकरिता किलो 50 किलोमीटर वरील पांढरकवडा येथे जाऊन तक्रार द्यावी लागते यामध्ये त्यांचा पैसा व वेळ दोन्ही वाया जात असतो.
पाटणबोरी येथे सद्यस्थितीत एक जमादार तीन शिपाई यांचे भरोशावर कारभार सुरू असून शासकीय वाहन कोणतेही नाही, जेणेकरून तात्काळ पोहोचेल। पाटणबोरी पोलीस स्टेशन वेगळे झाल्यास पांढरकवडा येथे जाण्या-येण्याचा नागरिकांचा त्रास कमी होईल. यामुळे लोकांच्या पैशाची व वेळेची बचत होईल .विशेष बाब म्हणजे पाटनबाेरी येथील नवीन पोलीस स्टेशनची निर्मितीचा प्रस्ताव याआधी सुद्धा मंजूर झाला असून याकडे कोणत्याही सरकारने अथवा लोकप्रतिनिधी ने गंभीरतेने ने लक्ष दिले नाही. सदर प्रस्ताव अनेक वर्षापासून धुळखात पडून आहे. त्यामुळे आता नवीन पोलीस स्टेशन चा निर्मितीचा प्रस्ताव मंजूर करून लवकर पोलीस स्टेशन निर्मिती करण्यात यावी ,अशी मागणी सचिन रमेशराव पत्रकार यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे मुंबई येथील त्यांचे कार्यालयात जाऊन केली आहे..