युवराज मेश्राम, विदर्भ चीफ ब्युरो
नागपूर:- जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील सात नवरी येथे उज्वला सुरेश थुतुरकर नामक महिलांचा तीन ऑगस्ट रोजी शेतात वीज पडून मृत्यू झाला होता या घटनेची नुकसान भरपाई म्हणून त्यांचे पती सुरेश थुतुरकर यांचे नावे चार लाखाचा धनादेश देण्यात आला होता परंतु हा धनादेश दोनदा बँकेत तांत्रिक कारणामुळे वटला नाही करिता हा धनादेश तातडीने वटवून मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य सलिल देशमुख यांनी जिल्हाधिकारी केली आहे.
उल्लेखनीय म्हणजे नैसर्गिक आपत्ती पडल्यास वारसाला आर्थिक मदत दिली जाते. ही मदत तातडीने देण्याची तरतूद सुद्धा आहे असे असतानाही सात नवरी येतील थुतुरकर कुटुंबीयांना महिन्याभरापासून आर्थिक मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. घटना घडतात जिल्हा परिषद सदस्य देशमुख यांनी सात नवरे येथे भेट थुतुरकर कुटुंबाची सात्वन केल होत व शिवाय शासन मदत मिळवून देण्याचे आश्वासन कुटुंबांना देण्यात आले होते या संबंधित अधिकाऱ्याची चर्चा केली होती त्यानंतर दहा दिवसांनी देशमुख यांच्या उपस्थिती महसूल विभाग अधिकाऱ्यांनी पेटीत सुरेश थुतुरकर यांच्याकडे चार लाख रुपयाचा धनादेश उपलब्ध केला होता.
थुतुरकर यांनी हा धनादेश वटवण्यासाठी बाजार गाव येथील बँक ऑफ इंडिया शाखेत जमा केला होता परंतु पहिल्यांदाच संबंधित खात्यात पैसेच नसल्याचे तो धनादेश परत आला त्यानंतर तुरकर यांनी चौकशी करून परत तो धनादेश वटवण्याचा टाळला यावेळी सुद्धा तहसीलदारांनी स्वाक्षरी बरोबर नसल्याची माहिती देत बँकेने धनादेश वटवण्यास नाकार दिला दरम्यान हा प्रकार गावकऱ्यांनी सलील देशमुख यांच्या निदर्शनात आणून दिला त्यानुसार सलील देशमुख यांनी जिल्हाधिकारी विपी नेत्यांकर यांच्याशी चर्चा करून ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली या गंभीर प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालून पीडित कुटुंबीयाला तातडीने मदत करू असे आश्वासन जिल्हाधिकारी दिले त्यानंतर सुरेश थुतुरकर यांनी तिसऱ्यांदा शासन धनादेश बाजारगाव येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत वटवण्यासाठी टाकला आहे