मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी
अहेरी:- गडचिरोली जिल्हा हा आदिवासी व अतीदुर्गम तसेच अती संवेदनशील म्हणून ओळखले जाते तसेच या ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेऊन सुद्धा त्या विद्यार्थ्यांना संस्काराची व्याख्या माहीती नाही याकरीता या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना संस्कार अंगी प्राप्त करण्यासाठी एकल विद्यालयाचे शिक्षण घेणे गरजेचे आहे, असे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी पक्षाचे जिल्हा महामंत्री श्री रविंद्र ओल्लालवावार यांनी अहेरी तालुक्यातील एकल अभियान अंचल आलापल्ली व अभ्युदय युथ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा बोरी येथे आयोजित क्रिडा सम्मेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकल अभियान अंचल आलापल्ली चे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री रवि नेलकुंद्री हे होते प्रमुख अतिथी म्हणून बोरी ग्रामपंचायत चे उपसरपंच श्री पराग ओल्लालवावार, एकल अभियान अंचल उपाध्यक्ष श्री संतोष मद्दीवार,एकल अभियान अंचल प्राथमिक शिक्षा प्रभारी श्री प्रकाश दुर्गे, एकल अभियान अंचल भाग आरोग्य प्रमुख श्रीमती रेणुका कंचकटले,एकल अभियान लगाम संच उपाध्यक्ष श्री सुरेश गंगाधरीवार,एकल अभियान लगाम संच सचिव श्री अखिल कोलपाकवार, भारतीय जनता पार्टी पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते श्री नितीन गुंडावार,आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी मार्गदर्शन करतांना एकल अभियान अंचल प्राथमिक शिक्षा प्रभारी श्री प्रकाश दुर्गे व एकल अभियान संच लगाम सचिव श्री अखिल कोलपाकवार यांनी उपस्थित नागरिकांना अहेरी उपविभागातील ग्रामीण भागातील ३०० एकल विद्यालयात विद्यार्थ्यांना देत असलेल्या पंचमुखी शिक्षणाबाबत माहिती देऊन एकल विद्यालयाचे महत्व पटवून दिले. प्रास्ताविक अंचल अभियान भाग आरोग्य प्रमुख श्रीमती रेणुका कंचकटले यांनी केले संचालन एकल अभियान इंदाराम संच प्रमुख श्री महेश बुरमवार तर आभार एकल अभियान लगाम संच प्रमुख श्री साईबाबा सदनपवार यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एकल अभियान अंचल प्रमुख श्री नरेश गड्डमवार,एकल अभियान अंचल प्राथमिक शिक्षा प्रमुख श्री संजू चौधरी,एकल अभियान अंचल कार्यालय प्रमुख श्री अरविंद निकेसर यांच्यासह संच टोळी यांनी सहकार्य केले.