प्रशांत जगताप
नागपूर:- नागपूरातील विविध संघटनाचे वतीने दिनांक 22 सप्टेंबर 2022 रोजी दिक्षाभूमी येथून संविधान सन्मान यात्रा सकाळी 11.00 वाजता काढण्यात आली होती. त्यात विदर्भात अनेक जील्हातील सहभागी झाले होते. त्यात महिला आणि तरुणीची उपस्थिती लक्षणीय होती.
या संविधान सन्मान यात्रेत संविधान जिंदाबाद… भारतीय लोकशाही जिंदाबाद… भारतीय समाजवाद जिंदाबाद… भारतीय धर्मनिरपेक्षता जिंदाबाद… भारतीय गणराज्य जिंदाबादच्या घोषणा फलक, विविध रंगाचे झेंडे, बनर, बिल्ले, रंगीत रीबीन लाऊन स्त्रि पुरुष, युवक- युवती, श्रमिक, बुद्धीजीवी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
आज भारतीय संविधानामुळे देशात लोकशाही नांदत आहे. आज भारतीय संविधान अनेक देशासाठी दीपस्तंभाचे काम करत आहे. न्याय, हक्क, स्वातंत्र्य आणि अधिकार आणि नागरिकाचे मूलभूत अधिकार बहाली साठी संविधान सर्व भारतीय जनतेत रुजवलं गेलं पाहिजे. या संविधानाचा सन्मान हा प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. त्याचमुळे ही संविधान सन्मान यात्रा काढण्यात आली आहे. यावेळी विदर्भातील अनेक जिल्हातील नागरिक या संविधान सन्मान यात्रेत सहभागी होण्यासाठी आले होते. झमकोली, सीरसी, वेलतूर, फेगड, कटारा, नवेगाव, हिगनघाट, नेहरु नगर, मानेवाडा, पांच्यांशी प्लॉट व नागपूरातील विविध वसाहतीतील नागरिकांनी सहभाग घेतला.
नागपूर येथील प्रसिद्ध दीक्षाभूमी येथून या संविधान सन्मान यात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर नागपूर शहरातील काचीपूरा, लोकमत चौक, झाशी चौक, व्हेरायटी चौक विविध चौकातून घुमुन संविधान चौकात यात्रा पोहचली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्या नंतर लेझीम गीत, क्रांती गीत झालेत. संविधान प्रास्ताविका वाचन करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने प्रा. देविदास घोडेस्वार, त्रिलोक हजारे, गौतम काबंळे, वदंना महात्मे, रुबीना पटेल, राहुल परुळकर, दिनानाथ वाघमारे, सबीया खान, संमीक्षा गणवीर, पुंडलीक तीजारे, लक्षमन बालपांडे, ईश्वर सातपुडके, एकनाथ गजभिये, माया ढाकणे, पींकी रोडगे, किसनाबाई भानारकर, कल्पना जोगे, अनंत अमदाबदकर, प्रकाश तोवर, ज्योती नीचळ , सुजाता भोंगाडे यांनी संविधान सन्मान यावर भाषणे झालीत. विलास भोंगाडे यांनी संचालन केले.
यावेळी उपस्थित कुमुद कांबळे, निलीमा घाटोळे, सरीता जुनघारे, रोषणी गंभीर, सोनाली जींदे, जासंवंदा खोंबागडे, रेखा गणवीर, सुजाता येवले, वनीता लोखंडे, अश्विनी सोमकुवर, वैशाली शहाकार, शिला बोरकर, सविता रामटेके, उज्वला नारनवरे, मनिषा शहारे, मनिषा मुनघाटे, अलका मडावी, करुणा करहाडे, अस्वीनी भारद्वाज, असीत ढवळे, प्राची भैसारे यांनी विषेश परीश्रम घेतले. या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. असे प्रसिद्धीपत्रकाद्वारा कळविण्यात आले आहे.

