महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन उत्तर प्रदेश:- प्रयागराज येथे भरलेल्या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे उत्तर प्रदेश प्रशासनाने केलेल्या उपायोजना बाबत नागरिकांकडून प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात येत आहे. या चेंगराचेंगरीत मृत झालेल्या भाविकांच्या नातेवाईकांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 25 लाखांची नुकसान भरपाई घोषित केली.
त्यात बागपत येथील जैन मंदिरात लाकडी खांब पडून भीषण दुर्घटना झाली यात 7 जैन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने जैन भाविकांच्या नातेवाईकांसाठी कोणत्याही प्रकारच्या नुकसान भरपाईची घोषणा जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे राज्य सरकारवर दोन समाजामध्ये भेदभाव करण्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पण दोन्ही घटना भारतातील असून दोन्ही घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेले भारतीय आहेत. त्यामुळे दोन्ही घटनांमधील भाविकांमध्ये भेदभाव न करता कुंभमेळ्यातील भाविकांच्या नातेवाईकांना देण्यात आलेल्या नुकसान भरपाई प्रमाणे जैन भाविकांच्या नातेवाईकांनाही नुकसान भरपाई जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी ऑल इंडिया जैन जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष हार्दिक हुंडिया यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे.

