आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून पिंपरी चिंचवड मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे 3 मुलींनी वडील मृत्यूच्या दारात उभे असताना बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फसला आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण पुण्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या 65 वर्षीय व्यक्तीला कर्करोग व हृदयरोगाचे आजार होते. त्यांना एक मुलगा आणि तीन मुली असून, सर्व विवाहित आहे. आजारी वडील हे आपल्या मुलाबरोबर राहत होते. अचानक 14 जानेवारी रोजी त्यांची तब्येत खूप गंभीर झाल्याने त्यांना तातडीने पिंपरी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावत गेल्याने ते ब्रेन डेड झाले आहे. याची माहिती या 3 मुलींना कळताच त्यांची डाव साधत रुग्णालयात ब्रेन डेड वडिलांच्या अंगठ्याचे ठसे बनावट मृत्युपत्रावर घेऊन त्यांच्या मालमत्तेवर हक्क मिळवण्याचा तिन्ही मुलींनी भयंकर कांड केले.
वडिलांच्या संपत्तीवर हक्कासाठी केलं कांड: ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीच्या नावावर पिंपळे गुरव येथे तीन मजलीची इमारत असून वडील गेल्यानंतर मुलगा आपल्याला मालमत्तेत वाटा देणार नाही, या भीतीने या तिन्ही मुलींनी हा षडयंत्र रचले. विशेष म्हणजे वडील आजारी असताना एकदाही न भेटणाऱ्या या मुली अचानक रुग्णालयात वारंवार खेपा घालू लागल्या होत्या.
रुग्णालयात बनावट मृत्युपत्रावर अंगठ्याचे ठसे: 19 फेब्रुवारीला मुलगा कामानिमित्याने रुग्णालयाच्या बाहेर गेला असताना तिन्ही मुली रुग्णालयात आल्या आणि वडिलांच्या बेडजवळ पोहोचल्या. त्यांनी आधीच तयार केलेले बनावट मृत्युपत्र समोर ठेवले आणि वडिलांच्या हाताचे ठसे घेतले. एवढेच नाही, तर त्यांच्या हातात पेन देऊन सही घेण्याचाही प्रयत्न केला. हा प्रकार रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आला आणि त्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. मुलींना थांबवत त्यांनी पोलिस आणि मुलाला माहिती दिली. यानंतर मुलाने संत तुकारामनगर पोलिस स्टेशन मध्ये या तिन्ही बहिणी विरोधात तक्रार दाखल केली. मुलाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून, सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.
मालमत्तेवर वाद नव्हता, तरीही विश्वासघात? सर्व भावंडांची आर्थिक परिस्थिती चांगली असून, कधीही संपत्तीच्या वाटणीवरून वाद झाला नव्हता. फक्त किरकोळ वाद होत असत, मात्र मालमत्तेवर हक्क सांगण्याचा प्रश्न कधीच उपस्थित झाला नव्हता.
भावाचा सवाल – बहिणींनी असं का केलं? “आम्ही चार भाऊ-बहिणी आहोत. बहिणी पूर्वी घरी येत-जात होत्या, पण वडील आजारी पडल्यापासून त्यांनी रुग्णालयात येण्याचेही टाळले. मात्र, जेव्हा डॉक्टरांनी त्यांची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले, तेव्हा त्या दोन-तीन दिवस येऊ लागल्या. पण त्यांनी असा प्रकार केल्याचे कळल्यावर आम्हाला धक्का बसला.” असे रुग्णाचा मुलाने सांगितले

