पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- मागील काही दिवसांपासून उपराजधानी नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात हत्येचा घटना घडत आहे. त्यामुळे गृहमंत्र्याच्या नागपुरात चाललं तरी काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे. त्यात परत एकदा नागपुरात मागील 24 तासात तीन हत्येचा घटनेने शहर हादरले आहे.
कुख्यात आरोपीची साथीदाराने दगडाने ठेचून केली हत्या: पहिली घटना इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रामबाग संकुलात घडली. इथे वर्ध्याच्या कुख्यात आरोपीला त्याच्याच साथीदाराने किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दगडाने ठेचून हत्या केली. मृतक हा कुख्यात आरोपी होता त्याच्यावर दरोडा, हत्येचा प्रयत्न, खंडणी सारखे गुन्हे दाखल होते. त्याला एका वर्षासाठी वर्धा पोलिसांनी तुरुंगात पाठवले होते. घटनेच्या दिवशी तो तुरुंगातून बाहेर आला आणि आपल्या साथीदारांना भेटायला गेला तिथे त्याचे मित्रांशी कोणत्या गोष्टीवरून वाद झाले आणि त्याच्या दोन्ही मित्रांनी दगडाने डोकं ठेचून त्याची हत्या केली.
भांडण सोडवणे तरुणाला जीवावर बेतले: दुसरी घटना कपिल नगरमध्ये घडली जिथे दोन लोकांमधील भांडण सोडवणे एका तरुणाला जीवावर बेतले. मृतक तरुण एका लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी आला होता. या मध्ये वधूच्या भावाचे मित्र आरोपीं आपल्या दोन गुंडांसह लग्नात न बोलावता आले आणि ते वर पक्षाच्या लोकांना शिवीगाळ करू लागले. आणि समारंभाचे वातावरण खराब करू लागले. वधूच्या भावांनी त्यांना समजावून शांत करून तिथून बाहेर काढले. तरीही ते वर पक्षाच्या लोकांना शिवीगाळ करत होते. हे पाहून तरुणाने हस्तक्षेप केला या वर आरोपींनी तरुणाची चाकूने वार करून हत्या केली.
लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या: तिसरी घटना नागपूर ग्रामीण परिसरातील पारशिवनी येथून समोर आली आहे. येथे शुल्लक कारणांवरून दोन भावांमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातून लहान भावाने मोठ्या भावावर काठीने जोरदार मारहाण केली. त्यात मोठ्या भावाचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी लहान भावा विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
एकाच रात्री या तीन घटना घडल्यामुळे नागपूर हादरले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.

