Friday, December 5, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home बीड

बीड येथे भाजपाची अर्थसंकल्प पत्रकार परिषद संपन्न, आत्मनिर्भरतेतून ‘विकसित भारत’कडे नेणारा अर्थसंकल्प.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 23, 2025
in बीड, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
बीड येथे भाजपाची अर्थसंकल्प पत्रकार परिषद संपन्न, आत्मनिर्भरतेतून ‘विकसित भारत’कडे नेणारा अर्थसंकल्प.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अर्थसंकल्पामुळे नागरिक होतील देशविकासाचे भागीदार, प्रत्येक घटकाच्या बळकटीकरणासाठी ठोस तरतुदी: प्रदीप पेशकार यांचा विश्वास

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणार असून त्यांची क्रयशक्ती उंचावल्याने देशाच्या विकासाला चालना मिळेल. १४० कोटी भारतीयांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेतील, असा विश्वास प्रदीप पेशकार, प्रदेश प्रवक्ते भाजपा यांनी व्यक्त केला. नागरिकांची बचत वाढून तेच देशविकासाचे भागीदार कसे बनतील, यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले. आज भाजपा कार्यालय बीड येथे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार आणि भाजपा जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली.

यावेळी श्री. पेशकार म्हणाले की, शेतकरी, गरीब, महिला आणि युवा हे विकसित भारताचे चार प्रमुख स्तंभ असून या चारही गटांच्या सशक्तीकरणासाठी अर्थसंकल्पाने महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. सामाजिक क्षेत्र, लहान मुले व युवाशिक्षण, पोषण तसेच आरोग्यापासून स्टार्टअप्स आणि गुंतवणुकीपर्यंत प्रत्येक क्षेत्राला गती देणाऱ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. हा अर्थसंकल्प गरीब आणि मध्यमवर्गीयांना सशक्त करणार असून तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करणारा आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ग्रामीण विकासासाठी कृषी क्षेत्र, उद्योजकता वाढ, रोजगारनिर्मिती, MSME क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि नाविन्यासाठी गुंतवणूक तसेच जागतिक स्तरावर आर्थिक स्पर्धात्मकतेसाठी निर्यात क्षेत्र या चार प्रमुख आधारस्तंभांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. करप्रणाली, शहरी विकास, खाणकाम, वित्तीय सुधारणा, ऊर्जा आणि नियामक सुधारणा या सहा क्षेत्रांतील सुधारणांना प्राधान्य देण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

श्री. पेशकार पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना. खाद्यतेल आत्मनिर्भरते साठी सहा वर्षांची विशेष मोहीम. मखाना आणि मत्स्य उत्पादनासाठी स्वतंत्र मंडळ. फळ-भाजीपाला उत्पादक व कापूस शेतकऱ्यांसाठी विशेष योजना. युरिया आत्मनिर्भरता योजना यांसारख्या महत्वपूर्ण योजनांमुळे देशातील अन्नदाते अधिक सक्षम होतील.

याशिवाय पाच ‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स’ ची स्थापना. ‘भारतीय भाषा पुस्तक योजना’. सर्व सरकारी माध्यमिक शाळांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी. पुढील पाच वर्षांत ५०,००० अटल टिंकरिंग लॅब्स यांसारख्या महत्वपूर्ण शैक्षणिक तरतुदींमुळे भारतातील विद्यार्थी जागतिक दर्जाच्या शिक्षणाने सक्षम होतील, असेही ते म्हणाले.

देशाच्या उज्वल भविष्यासाठी मध्यमवर्गाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त. ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक व्याजावर TDS मर्यादा ₹५०,००० वरून ₹१ लाख. घरभाड्यावर TDS मर्यादा ₹२.४० लाख वरून ₹६ लाख यांसारख्या महत्वाच्या निर्णयांमुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळेल.

सामाजिक विकासासोबतच पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, शाश्वत आर्थिक विकास, तंत्रज्ञान, आरोग्य, कृषी, MSME आणि निर्यात यांसारख्या क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत. उत्पादन क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करून लघु व मध्यम उद्योगांना बळकटी देण्यासाठी सरकारने महत्वाची पावले उचलली आहेत, असेही श्री पेशकार यांनी सांगितले.

जन आरोग्य योजना, सक्षम आंगणवाडी व पोषण २.० कार्यक्रम, गिग वर्कर्सचे कल्याण आणि जलजीवन मिशन यांसारख्या योजनांना अधिक बळ देत सामाजिक न्याय व जनकल्याणालाही सरकारने प्राधान्य दिले आहे, असेही श्री पेशकार म्हणाले.

या वेळी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष नवनाथ शिराळे, चंद्रकांत फड, अशोक लोढा यांच्यासह भाजपा पदाधिकारी, पत्रकार बांधव उपस्थित होते.

Tags: BidBid BJPआत्मनिर्भरतेतून ‘विकसित भारत’कडे नेणारा अर्थसंकल्प.बीड येथे भाजपाची अर्थसंकल्प पत्रकार परिषद संपन्न
Previous Post

तिरळे कुणबी सेवा मंडळाच्या नागपुर समाज भवनात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा.

Next Post

पुणे क्राईम ब्रांचची धडक कारवाई: पिस्टल व काडतुसासह सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पुणे क्राईम ब्रांचची धडक कारवाई: पिस्टल व काडतुसासह सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या.

पुणे क्राईम ब्रांचची धडक कारवाई: पिस्टल व काडतुसासह सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In