हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. येते आज महाशिवरात्री निमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण असताना नदीवर अंघोळी करण्यासाठी गेलेल्या कुटुंबातील 3 सख्ख्या बहिणींचा वैनगंगा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यूचीच्या घटनेने शोककळा पसरली आहे. यापैकी एका मुलीचा मृतदेह मिळाला असून दोघींचा शोध सुरू आहे.
आज महाशिवरात्री असल्यामुळे दुपारी 12.00 वाजताच्या दरम्यान चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील या तिघी सख्ख्या बहिणी आपल्या काका, काकू आणि त्यांच्या 4 वर्षीय मुलासह गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा येथे जात होते, मात्र हरणघाट मार्ग खराब असल्याने मार्कंडासाठी गडचिरोलीमार्गे जात असताना व्याहाड येथील वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळ करण्याचा त्यांनी बेत आखला. अशातच चंद्रपूर-गडचिरोली सिमेवरील एका झाडाखाली गाडी ठेवून सर्व जण नदी पात्रात उतरले. मात्र आंघोळ करीत असतानाच एक लहान बहीण पाण्याच्या प्रवाहात वाहत असल्याचे दिसताच इतर सर्वांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात काका-काकू आणि त्यांचा मुलगा थोडक्यात बचावला. तर 3 बहिणींचा मात्र या पाण्याचा प्रवाहात वाहत जाऊन खोल पाण्यात मृत्यू झालाय. प्रतिमा प्रकाश मंडल वय 23 वर्ष, कविता प्रकाश मंडल वय 21 वर्ष आणि लिपिका प्रकाश मंडल वय 18 वर्ष अशी मृतकांची नावं असल्याची माहिती पुढे आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी 12.00 वाजताच्या दरम्यान चंद्रपूर येथील प्रकाश मंडल आपल्या कुटुंबासह गडचिरोली मार्गावरील व्याहाड येथील वैनगंगा नदीच्या पात्रात अंघोळीसाठी गेले होते. नदीच्या पात्रात उतरल्यानंतर काही वेळातच कविता मंडल, प्रतिमा मंडल आणि लिपिका मंडल या सख्ख्या बहिणी पाण्याचा अंदाज आल्याने खोलात गेल्या. त्यांना पोहता येत नसल्याने त्या नदीत बुडायला लागल्या तर एक मुलगा आणि महिलाही प्रवाहात खडकाला धरुन राहिल्याने थोडक्यात बचावले. यावेळी त्यांची आरडाओरड सुरू असूनही कोणीच मदतीला नव्हते. यातील कुटुंबातील मुलगा आणि महिला पात्रातील खडक हाताला लागल्याने त्याला पकडून राहिले. मात्र तीन बहिणी बेपत्ता पाण्याच्या प्रवाहात नाहीशा झाल्या. यातील कविता मंडल हिचा मृतदेह मात्र काही वेळाने मिळाला. मात्र दोघी बहिणींचा शोध सरु करण्यात येत आहे. घटनेची माहिती कळताच पोलीसांनी धाव घेतल्याने खडकाला पकडून असलेल्या मुलाला आणि महिलेला वाचवण्यात कसेतरी यश मिळाले. महाशिवरात्री निमित्ताने अनेक भाविक नदीपात्रात अंघोळीसाठी जात असतात. परंतू पोहण्याचा जराही अनुभव नसल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून. मंडल कुटुंबियांवर महाशिवरात्री ही कालरात्री ठरल्याची चर्चा सुरू आहे.

