राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यातील मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी 25 ऑगस्टला वराह जयंती साजरी केली. वराह जयंती साजरी करण्यावरून राज्यात राणे वर जोरदार टीका-टिपण्णी सुरू आहे. आता नितेश राणे यांनी तीन ठिकाणी वराह जयंती साजरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी नितेश राणेवर जोरदार टीका केली आहे. यावरून नितेश राणे यांचा हा निर्णय सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पचलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी चेंबूर, नवी मुंबई आणि ठाण्यात सोमवारी 25 ऑगस्ट ला वराह जयंती साजरी केली. तिथे त्यांनी वराह पूजन केले, महाआरती केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने नितेश राणे यांना जोरदार टोला लगावला आहे.
नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 20 ऑगस्ट रोजी पत्र पाठवले होते. त्यात 25 ऑगस्ट रोजी वराह जयंती अधिकृत साजरी करण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती. त्यानंतर आज त्यांनी वराह जयंती साजरी केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अमोल मिटकरी यांनी थेट बोल सुनावले आहेत. ‘हे रानडुक्कर शेतकऱ्यांचे नुकसान करतात. शेतकऱ्यांचं दुखणं ऐकून घेण्याऐवजी सरकार मधीलच मंत्री शेतकऱ्यांच्या शत्रूची जाहीर आरती करत असतील, त्यांना संरक्षण देणार असतील तर याला शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार म्हणतात. वराह पुजनाचा त्यांनी घरात दोन-चार डुक्कर बांधावीत आणि रोज आरती करावी. वराहाला डुक्कर म्हणतात. याला आमची काही हरकत नाही.

