🖋️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- येथून एक खळबजनक बातमी समोर आली आहे. येथील बालगृहात राहणारा मुकबधीर गतीमंद मुलगा बेपत्ता झाल्याने मुंबईनाका पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार एन. पी. काकड यांनी २८ सप्टेंबरला एका मुकबधीर गतीमंद मुलास बालगृहात ठेवले होते.
सोमवारी दि.१० बालगृहात तपासणी केली असता ३२ मुलांपैकी एक मुलगा दिसला नाही. त्यामुळे त्याची शोधाशोध केली. मात्र तो आढळून न आल्याने मुंबईनाका पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.