मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली:- जिल्हात यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्ये खचले असल्याचे दिसून येत आहे. त्यात राजाराम वरून कमलापूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर सूर्यपली गावाजवळ पूल वाहून गेल्यामुळे रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला होता. सदर रस्त्यावरून ये- जा करताना चार चाकी, दुचाकी वाहनांना जीवमुठीत घेऊन रस्ता पार करावा लागत होता. या तुटलेल्या पुलामुळेच राजाराम मार्गे दामरेंच्या बस सेवा बंद करण्यात आली. या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन सुरक्षा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था राजारामने पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी जपत दगड मुरूम टाकून खड्डा बुजवून सर्वांचा रहदारीचा मार्ग केला सुखकर करण्यात आले आहे.
सूर्यपली गावाजवळ पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याची माहिती सुरक्षा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था यांच्या अध्यक्ष ॲड. आकदर, संस्थेचे सचिव तथा राजाराम ग्रामपंचायतच्या उपसरपंच सौ. सुरक्षा एच. आकदर, संस्थेचे उपाध्यक्ष मनोज आकदर, संस्थेचे सदस्य मधुकर गोंगले, राजारामचे सरपंच नागेश कन्नाके, सदाशिव गोंगले यांना माहीत पडताच गावकऱ्यांनी सहकार्याने हा पूल दुरस्त करून नागरिकांना रहदारी साठी मार्ग सुकार करून दिला.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348