महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
संगमनेर:- राज्यातील गायरान जमिनींवरील आक्रमणे काढण्याबाबत उच्च न्यायालयाने निर्णय घेतला असल्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिक त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत आहे. या नागरिकांना दिलासा देण्या करिता राज्य सरकारने ही कार्यवाही थांबविण्यासाठी तातडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचीमागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
गायरान जमिनीं बाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यभरातील ग्रामीण भागातील गोरगरीब व आदिवासी नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांच्याकडे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी पत्राद्वारे या विषया बाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणे बाबत विनंती केली आहे.
आ थोरात म्हणाले की राज्यभरातील ग्रामीण भागातील सामान्य नागरिक, आदिवासी व गोरगरीब गोरगरीब अनेक वर्षां पासून पिढ्यानपिढ्या या जागेवरवास्तव्य करून राहत आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यातील अनेक गावांच्या नागरिकांचा ही समावेश आहे.
शासनाने न्यायालयात याचिका दाखल करावी. गायरान जमीनीवर आदिवासी व गोरगरीब नागरिकांचा मोठा समावेश असून त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे हे गोरगरीब अत्यंत हवालदिल झाले आहेत. त्यामुळे या गायरान जमिनीवरील अतिक्रमणांबाबत होणारी कार्यवाही थांबवण्यासाठी शासनाने मध्यस्थी करत माननीय सर्वोच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल करावी व सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी ही काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजीमंत्री ई बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348