सतिश म्हस्के जालना जिल्हा प्रतिनिधी
मो. 9765229010
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- मागील चार ते पाच दिवसांपासून जालना शहरातील ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर वाढला असून, यंदाच्या हिवाळ्यातील पहीले धुके जालनेकरांनी अनुभवले. हिवाळ्याच्या सुरुवातीला काही दिवस शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर जालनेकरांनी अनुभवला मात्र त्यानंतर हिवाळ्यात थंडीचा जोर कमी जानवला होता, परंतु मागील चार पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे निर्माण झाले असल्याने त्यात वाऱ्यामुळे थंडीत भर पडली आहे, या बदललेल्या वातावरणामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.
या धुक्यामुळे वाहनाचा अपघात होण्याचे प्रकार वाढू शकते त्यामुळे अशा वेळी वाहने सावकाश आणि सावधानी पूर्वक चालवावे.

