महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन स्वातंत्र्य दिन विशेष:- भारताला परकीय गुलामीतून स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक महिला वीरांगनानी वीरगती पत्करली अनेकेनी क्रांतीची आग पेरली. अशा 20 महिला स्वतंत्रता सेनानी यात रानी लक्ष्मीबाई, सरोजिनी नायडू, बेगम हजरत महल, भीकाजी कामा, कस्तूरबा गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, अरुणा आसफ अली, सुचेता कृपलानी, विजयलक्ष्मी पंडित, मातंगिनी हाजरा, कनकलता बरुआ, लक्ष्मी सहगल, उषा मेहता, पूर्णिमा बनर्जी, तारा रानी श्रीवास्तव, अक्कम्मा चेरियन, अवंतीबाई, अंजलाई अम्मल, अजीजनबाई आणि बसंतलता हजारिका सह शेकडो महिलांनी फक्त स्वतंत्रता संग्राम मध्ये भाग न घेता त्यांनी समाजात महिलांच्या अधिकासाठी पण लड़ाई लढली आहे. आज 79 व्या स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्र संदेश न्युजच्या वतीने त्यांना सलाम.
रानी लक्ष्मीबाई:

रानी लक्ष्मीबाई झांसी की रानी, 1857 मध्ये देशात झालेल्या विद्रोहात ब्रिटिश सेनाच्या विरोधात वीरतापूर्वक लढत वीरमरण पत्करले. त्याअगोदर त्यांनी ब्रिटिश सरकारला सांगितले की, ‘मैं झाशी नही दुगी’ रानी लक्ष्मीबाई 1857 विद्रोहाच्या बलिदानाचे प्रतीक मानली जाते.
कनकलता बरुआ (1924 – 1942)

आसामच्या या युवा वीरांगनेने फक्त 17 वर्षाची असताना भारत छोड़ो आंदोलनात भारतीय तिरंगा उचलून अंग्रेजा राजवटी विरोधात हुंकार फुंकला. 1942 मध्ये एका आंदोलनाचे नेतृत्व करत असताना कनकलता बरुआ यांना अंग्रेज फौजेच्या गोलीची शिकार बनली। कनकलता याचे बलिदान हे सर्व युवा पीढ़ीसाठी प्रेरणा स्रोत आहे.
मातंगिनी हजारा:

“गांधी बुढी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातंगिनी हजारा या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती होत्या. १९४२ मध्ये, वयाच्या ७२ व्या वर्षी, त्यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला. २९ सप्टेंबर १९४२ रोजी, जेव्हा त्या तामलुक पोलीस स्टेशन ताब्यात घेण्यासाठी आंदोलनाचे नेतृत्व करत होत्या, तेव्हा ब्रिटिशांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळी मारली गेली तरी, मातंगिनीने तिरंगा ध्वज खाली पडू दिला नाही आणि “वंदे मातरम” म्हणत शहीद झाली.
सरोजिनी नायडू:

“भारत कोकिळा” च्या नावाने प्रसिद्ध, एक कवियत्री आणि राजनीतिज्ञ, ज्यांनी भारतीय राष्ट्रीय कांग्रेस मध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावली.
बेगम हजरत महल:

अवध ची रानी, 1857 मध्ये ब्रिटिश सेनाच्या विरोधात विद्रोहात महत्वपूर्ण भूमिका निभावली. एक महिला असूनही त्यांनी स्वतंत्र भारताच्या लढाही मध्ये बलिदान दिलं.
मॅडम भीकाजी कामा:

भारतीय राष्ट्रीय ध्वजाला विदेशी धर्तीवर फडकवणारी ही पहीली व्यक्ति होती. एक महान स्वतंत्रता सेनानी आणि परोपकारी महिला म्हणून त्याची गणना होते.
कस्तूरबा गांधी:

कस्तूरबा गांधी या महात्मा गांधी यांच्या पत्नी होत्या. त्यांनी स्वतंत्रता संग्राम मध्ये सक्रिय भूमिका निभावली आहे.
कमलादेवी चट्टोपाध्याय:

एक समाज सुधारक और स्वतंत्रता सेनानी, जी अटक होणारी पहली भारतीय महिला होती.
अरुणा आसफ अली:

“भारत छोड़ो आंदोलन” मध्ये एक महत्वपूर्ण भूमिका निभाई, “ग्रैंड ओल्ड लेडी” के रूप मध्ये त्या ओळखल्या जातात.
सुचेता कृपलानी:

सुचेता कृपलानी या स्वतंत्र भारताचा पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. त्यांनी स्वतंत्र लढ्यात भूमिका निभावली.
विजयलक्ष्मी पंडित:

विजयलक्ष्मी पंडित या संयुक्त राष्ट्र महासभा मधील पहिल्या महिला अध्यक्ष होत्या.
लक्ष्मी सहगल:

लक्ष्मी सहगल या सुभाष चंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आज़ाद हिंद सैन्यामधील एक प्रमुख अधिकारी होत्या. त्यांनी “रानी झांसी रेजिमेंट” चे नेतृत्व केले.त्यांनी 500 महिलाची एक फ़ौज तयार केली, ती त्याकाळातली एशिया मधील की पहिली विंग होती.
उषा मेहता:

उषा मेहता यांनी भूमिगत रेडियो स्टेशन “कांग्रेस रेडियो” मध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावली. स्वतंत्र लढ्यात भूमिका त्यांची मोठी भूमिका होती.
पूर्णिमा बनर्जी:

पूर्णिमा बनर्जी यांनी “भारत छोड़ो आंदोलन” मध्ये सक्रिय भूमिका निभावली.
तारा रानी श्रीवास्तव:

तारा रानी श्रीवास्तव यांनी युद्धच्या मैदानात में घायल पडलेल्या आपल्या पतीला पाठीला बांधून रुग्णालयात घेऊन गेली, तिथून परत आल्यानंतर ती थेट युद्धाचा मैदानात उतरली.
अक्कम्मा चेरियन:

अक्कम्मा चेरियन त्रावणकोर ची “लोकलक्ष्मी”, ज्यांनी त्रावणकोर मध्ये स्वतंत्रता संग्राम मध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावली.
अवंतीबाई:

अवंतीबाई या रामगड ची रानी होत्या 1857 के विद्रोहात त्या अंग्रेजाच्या विरोधात लढल्या होत्या.
अंजलाई अम्मल:

अंजलाई अम्मल यांनी मद्रास प्रेसीडेंसी मध्ये स्वतंत्रता संग्राम मध्ये सक्रिय भूमिका निभावली.
अजीजनबाई:

अजीजन बाई या नर्तकी होत्या. यांनी 1857 च्या विद्रोहात कानपुर मध्ये अंग्रेजाच्या विरोधात लढाई लढली.
1857 च्या युद्धाच्या अपयशानंतर, जेव्हा सर्व प्रमुख योद्धे भूमिगत झाले, तेव्हा अजिजन देखील जंगलात लपून बसल्या. एकदा भूमिगत असताना, अजिजान पुरुषांच्या वेशात एका विहिरीजवळ लपली होती, तेव्हा सहा ब्रिटिश सैनिक तिथे आले. अजिजानने तिच्या पिस्तूलने चार ब्रिटिश अधिकाऱ्यांना ठार मारले. उर्वरित दोघे लपून मागून आले आणि तिला पकडले. या संघर्षात, अजिजानच्या हातातून पिस्तूल खाली पडले आणि तिचे केस मोकळे झाले. एका सैनिकाने तिला ओळखले. तो तिला मारू इच्छित होता; पण दुसऱ्याने तिला जनरल हॅवलॉकसमोर हजर करण्याचा निर्णय घेतला.
अजिजनबाईंना पाहून ब्रिटीश अधिकारी मोहित झाला. त्याने प्रस्ताव ठेवला की जर तिने तिच्या चुका मान्य केल्या तर तिला माफ केले जाईल. अन्यथा, तिला सर्वात कठोर शिक्षा दिली जाईल. अजिजनने माफी मागण्यास नकार दिला.
अजिजान म्हणाली की ब्रिटिशांनी भारतीयांवर इतके अत्याचार केल्याबद्दल माफी मागावी. एका नर्तकीचे असे उत्तर ऐकून ब्रिटिश अधिकाऱ्याला राग आला आणि त्याने तिला गोळ्या घातल्या.
बसंतलता हजारिका:

बसंतलता हजारिका या स्वतंत्रता संग्राम मधील एक गुमनाम नायिका होत्या. स्वातंत्र्यलढ्याची मशाल हातात घेऊन इतर महिलांना देशभक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या देशाच्या शूर कन्या बसंतलता हजारिका. पण आज आपल्याला त्यांच्याबद्दल काही ठिकाणीच वाचायला मिळते आणि त्यांचे चित्रही सापडत नाही. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आसामच्या या महिलांचे योगदान कोणीही दुर्लक्षित करू शकत नाही. या महिलांनी दुर्गम गावांमध्येही ब्रिटिश सरकारविरुद्ध निषेधाचा नारा दिला होता. १९३०-३१ मध्ये महिलांनी सर्वत्र ब्रिटिश सरकारला दिलेले आव्हान पाहण्यासारखे होते.
प्रीतिलता वाडेदार:

प्रीतिलता वाडेदार यांचा जन्म 5 मई, 1911 ला चटगांव (आधुनिक बांग्लादेश) मध्ये झाला. जे चटगांव शस्त्रागारात छाप्यात आईआरए च्या नेत्यांना पकडण्यात आले. त्यावेळी प्रीतिलता फक्त 21 वर्षाच्या होत्या. त्यांना 10 तरुणाच्या एका समूहाची कमान सोपवण्यात आली होती. पहाड़ाली यूरोपीय क्लब ची घेराबंदी केली 23 सप्टेंबर 1932 ला मध्यरात्री पुरुष वेश परिधान करून त्यांनी साहसपूर्वक नेतृत्व केले. त्यानंतर भीषण बंदूक लड़ाई मध्ये त्यांच्या पायाला गोली लागली आणि त्या तिथून पळू नाही शकला परंतु आत्मसमर्पण न करता त्यांनी साइनाइड ची गोली खाऊन त्यांनी शहीदत पत्करली.
सुनीती चौधरी:

सुनीती चौधरी ही एक भारतीय राष्ट्रवादी होती ज्यांनी शांती घोषसोबत 16 व्या वर्षी एका ब्रिटिश जिल्हा दंडाधिकाऱ्याची हत्या केली होती आणि सशस्त्र क्रांतिकारी संघर्षात सहभागी होण्यासाठी ती ओळखली जाते. तिला भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात तरुण महिला क्रांतिकारी म्हणून ओळखले जाते. 14 डिसेंबर 1931 रोजी ब्रिटिश नोकरशहा आणि कोमिलाचे जिल्हा दंडाधिकारी चार्ल्स जेफ्री बकलँड स्टीव्हन्स यांच्या कार्यालयात गेले. स्टीव्हन्स याचिकेकडे पाहत असताना, घोष आणि चौधरींनी त्यांच्या शाल खालील पिस्तूल काढले आणि त्यांना गोळ्या घालून ठार मारले.

