मधुकर गोंगले उपसंपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्यात डेंग्यूचा भयंकर उद्रेक बघायला मिळत आहे. त्यात अनेक नागरिकाचा बळी घेतला आहे. त्यात आरोग्य विभागाच्या हलगर्जी पणामुळे त्यात अजून वाढ झाली आहे. रुग्ण डॉक्टर भरोसे की भगवान भरोसे अशा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे मुलचेरा तालुक्यातील लगाम, येल्ला क्षेत्रात मागील 20 दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 15 ऑगस्ट रोजी काकरगट्टा गावातील एका महिलेचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यामुळे डेंग्यू मरनेवाल्याची संख्या 5 वर गेली आहे.
तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टरला कार्यमुक्त केले. तर दोन आरोग्य सहायकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. सद्या या परिसरात शेकडो पेक्षा जास्त रुग्ण आहेत.
लगाम, येल्ला येथे 6 ऑगस्टला पहिला डेंग्यूचा रुग्ण समोर आला होता. मात्र, याची माहिती तेथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तसेच लगाम प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्हा मुख्यालयाला कळविली नव्हती. त्यामुळे डेंग्यूची मोठ्या प्रमाणात साथ पसरली. यातून नंतर लागोपाठ 4 रुग्णाचा मृत्यू झाला, तर तब्बल 94 रुग्णांचे रक्तचाचणी अहवाल सकारात्मक आढळले. यामुळे एकच खळबळ उडाली.
जिल्हा आरोग्य प्रशासनाने हलगर्जीपणा करणाऱ्या लगामचे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. ओंकार कोल्हे यांना सेवेतून कार्यमुक्त केले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. गेडाम आणि डॉ. विनोद म्हशाखेत्री यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे. यासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक अशोक डोंगरवार व लगाम प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहायक लिंगाजी नैताम या दोघांना निलंबित केले आहे.
आपापल्या आरोग्य केंद्रांतील गावांमध्ये साथरोग पसरत असताना निष्काळजी केली, तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी याबाबत माहिती होताच गावात धाव घेतली होती , शिवाय चौकशी अहवाल सीईओंकडे पाठवला.

